इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून लोकांनी मला बहुमतांनी विजयी करून माझ्यावर विश्वास दाखवला . हा विश्वास सार्थ ठरवीन्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे .लोकप्रतिनिधी हा जनतेला उत्तरदायी असलाच पाहिजे या भूमिकेतून मी सतत कार्यरत आहे . दररोजच्या वृत्तपत्रातून माझ्या कार्याची दखल घेतलीच जाते . शीवाय दरवर्षी कामाचा आढावा मी लेखा जोखाच्या माध्यमातून प्रकाशित केला आहे .
इचलकरंजीतील अनेक लोक नोकरी -व्यवसायानिमीत्य पुणे , मुंबई ,दिल्ली ,बेंगलोर या या बरोबरच परदेशातही स्थायिक झाले आहेत .त्यानाही माझ्या कामकाजाबाबत माहिती कळावी ,या हेतूने हि वेबसाईट सुरु करीत आहे त्याचबरोबर आजही तरुण पिढी इंटरनेट सेवी असल्याने या तरुण मित्रांशी संपर्कात राहणे हा सुधा या वेबसाईटचा उद्देश आहे .
तेंव्हा मित्रांनो या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया द्यायला विसरू नका .